लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अहिल्यानगर शहरातल्या बहुतांश भागांत काल (दि. २७) प्रचंड पाणी वाहून गेलं. रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरुप आलं होतं. सखल भागात इतकं पाणी साचलं होतं, की चार चाकी आणि दुचाकी वाहनं या पाण्यात वाहून जातात की काय, अशी शंका व्यक्त केली जात होती. या परिस्थितीचं नक्की कारण काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की नगर शहर आणि परिसरातल्या अनेक भागांत रस्त्यांची काम करताना इथल्या जनतेचं हित पाहण्याऐवजी ठेकेदारांनी स्वतःचेच खिसे भरून घेतले. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत.
या रस्त्यांच्या कडेला खोल नाल्या करणं अपेक्षित असताना नाल्याच करण्यात आलेल्या नाहीत. जिथं आल्या केल्या गेल्या, तिथं सिमेंट पाईप टाकण्यात आलेले नाहीत. याचा परिणाम म्हणजे अहिल्यानगर शहर आणि परिसरात रस्त्यांना नाल्याचं स्वरुप प्राप्त झालं होतं. अधिक वेळ वाया न घालवता तुम्हीच पहा, काय आहे, अहिल्यानगरची परिस्थिती.