Tuesday, April 29, 2025

… आणि वैतागलेल्या कृष्णा काळेनं केली आत्महत्या…! मुजोर आणि उलट्या काळजाच्या सावकाराचा प्रचंड उच्छाद…! तालूका उपनिबंधक कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना सहआरोपी करा…!

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर

अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात नुकताच एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेकायदा सावकाराच्या सातत्यानं सुरु असलेल्या तगाद्यांना वैतागून गेलेल्या आणि सावकाराने आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे कृष्णा श्रीनाथ काळे (रा. शिवाजीनगर, केडगाव, अहिल्यानगर) या कर्जबाजारी झालेल्या दुर्दैवी इसमानं रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सुनील राजेश कुऱ्हाडे (रा. शिवाजीनगर, केडगाव, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कोतवाली पोलिसांना देण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे, की मयत कृष्णा काळेला शरद जाधव आणि त्याच्या मित्राने आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. मयत काळे याने जाधव यांच्याकडून तीस हजार रुपये हातउसने घेतले होते. मात्र जाधव हा मयत काळे याला व्याजासह पन्नास हजार रुपये मागत होता. 50 हजार रुपये दिले तरच तुझा ट्रॅक्टर देईल, असं जाधव म्हणत असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

काळे हा तीस हजार रुपये घेऊन जाधव याच्याकडे गेला असता जाधव याने पूर्ण पैसे दे, आणि ते म्हणत तुला जमत नसेल तर रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या कर, असं जाधव आणि त्याचा मित्र हे दोघे मयत काळेला अपमानास्पद बोलले. दरम्यान, या बोलण्याचा याचा राग अनावर झाल्याने कृष्णा काळे याने भडगाव वेगात आलेल्या रेल्वेखाली उडी टाकून जीवनयात्रा संपविली.

वास्तविक पाहता सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम तालूका उपनिबंधक कार्यालयातल्या अधिकाऱ्यांचं असतं. मात्र सावकारी करणाऱ्या अशा लोकांवर नियंत्रण ठेवण्यात अहिल्यानगर तालुक्याचे तालूका उपनिबंधक आणि त्यांचे सहकारी सपशेल अपयशी ठरले आहेत. या कार्यालयाने सावधगिरी बाळगली असती तर कृष्णा काळे याच्यावर आत्महत्येची वेळ आली नसती. त्यामुळे कृष्णा काळेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या शरद जाधव, त्याच्या मित्राला या आत्महत्येस जबाबदार धरत या दोघांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केडगावच्या मुजोर आणि उलट्या काळजाच्या सावकारानं प्रचंड उच्छाद मांडल्यानंच ही दुर्दैवी वेळ आली असल्यास या फिर्यादीवरुन स्पष्ट होत आहे. ज्या तालुका उपनिबंधक कार्यालयातल्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे ही दुर्दैवी घटना घडली, त्या तालूका उपनिबंधक कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना सहआरोपी करा, अशी मागणी संतप्त नागरिकांमधून केली जात आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी