लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाचे आज (दि. ३०) शेवटचे म्हणजे 40 वे पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानिमित्ताने अलीबागच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून आरती करण्यात आली. फुलांमध्ये ‘धर्मयोद्धा’ अशी अक्षरे साकारण्यात आली होती. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक उत्सव समितीतर्फे याचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी जे बलिदान दिलं, त्यांच्या त्या बलिदानाचं स्मरण व्हावं आणि भावी पिढीला त्याची माहिती व्हावी, यासाठी बलिदान मास पाळला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू मुघल बादशहा औरंगजेब याने छत्रपती संभाजीराजे यांना कैद केले. तब्बल 40 दिवस औरंगजेबने सभाजीराजेंना कैद करुन त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. संभाजीराजेंना औरंगजेबाच्या तावडीतून सोडवण्यासाठी कुणीच प्रयत्न का केला नाही? याबाबद्दल इतिहास ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील
यांनी सांगितलाय.
औरंगजेबने संभाजेरांजेंवर धर्मांतर करण्यासाठी त्यांचे प्रचंड हाल केले. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी औरंगजेबने त्यांच्यावर दबाव आणला. ऐवढ्या मोठ्या शूर राजाला कैद केल्यानंतर मराठे लोक धावत माझ्याकडे येतील सर्व किल्ले माझ्या स्वाधीन करतील असे औरंगजेबला वाटत होते. येसूबाई येतील आणि सर्व राज्य स्वाधीन करतील असे औरंगजेबला वाटत होते. येसूबाईंनी स्वत:ला अटक करुन घेतली पण स्वराज्य रक्षणासाठी दीराला वाचवले. औरंगजेबने संभाजीराजेंची क्रूर हत्या केली. तेव्हासुद्धा अनेक मराठा, ब्राम्हण, राजपूत सरदार औरंगजेबच्या तळावर होते पण कुणीच पेटून उठले नाही. संभाजीराजेंना वाचवण्यासाठी कुणीच पुढे आले नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव्य असल्याची खंत विश्वास पाटील यांनी व्यक्त केली आहे.