Wednesday, June 4, 2025

मूर्खांनो सुधरा रे जरा…! माणसं तमाशानं बिघडत नाहीत…! किर्तनानं सुधरत नाहीत…! मग आता नक्की काय करायचं?

लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर

हल्लीचा समाज खूप सुधारला आहे. इंटरनेटच्या युगात वावरत असलेली माणसं आणि त्यांनी केलेली प्रगती हे सारं पाहून माणूस फार फार वर्षांपूर्वी कसा होता, आज कसा आहे, याचा विचार जर केला तर विज्ञानाच्या सहाय्याने माणसाने अक्षरशः उत्क्रांती केली, असं म्हणावं लागेल.

असं असलं तरी मानवी समाजातील काही माणसं जनावरांपेक्षा वाईट पद्धतीनं एकमेकांना वागणूक देत आहेत. घरात आलेली सून ही कोणाची तरी मुलगी असते. आणि घरातून जाणारी मुलगी ही कोणाची तरी सून असते. हेच सर्वसामान्य माणसासाठी असलेलं ‘लॉजिक’ अनेक जण विसरले आहेत. परिणामी समाजात वैष्णवी हगवण्यासारखं प्रकरण घडतं आणि यापुढेही घडतंच राहणार. कारण माणसं किर्तनातून सुधरत नाहीत आणि तमाशानं आणि बिघडत नाहीत. अशा परिस्थितीत प्रश्न हा उरतो, की हल्लीच्या तथाकथिच प्रगती केलेल्या माणसाला सुधरविण्यासाठी समाजप्रबोधनकारांनी नक्की काय करायला हवंय…? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि विचार करा आणि हो, पुन्हा एकदा तीच विनंती, लोकपत youtube चॅनलला जास्तीत जास्त संख्येनं लाईक करा, सबस्क्राईब करा. या व्हिडिओची लिंक सगळीकडे व्हायरल करा. धन्यवाद.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी