लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अहिल्यानगर शहराजवळच्या आरणगाव, खडकी, वाळकी आदी परिसरात दि. २७ रोजी जो पाऊस झाला आणि त्या पावसानंतर या गावांचा संपर्क तुटला, त्यावेळी कुठे भयानक परिस्थिती पहायला मिळाली. शंभर वर्षांत या गावांमध्ये असा पाऊस झाला नाही, अशी माहिती अरणगावचे सरपंच पोपट पुंड यांनी ‘लोकपत’ डिजिटल मीडियाशी बोलताना दिली.
पावसाच्या या भयानक परिस्थितीमध्ये अहिल्यानगर तालूका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे अक्षरशः सर्वसामान्यांचे जीवनदाते ठरले. पाच लोकांचा जीव त्यांनी वाचवला. नक्की पहा पावसाचा हा थरार…!